शिकागो..पुन्हा एकदा...


मागच्या आठवड्यात मी माझ्या भावा बरोबर पुन्हा एकदा शिकागो वारी केली... गेल्या वर्षभरातील ही माझी ६ वी शिकागो ट्रिप.. st louis (stl) आणि शिकागो म्हणजे अगदी मुंबई पुण्यासारखं.. म्हणजे मुंबई किंवा पुण्याशी दोन्ही शहरांचं काही साम्य नाही पण येण्याजाण्याच्या द्रुष्टीने अगदी सारखच.. म्हणजे माझा जो मित्र भारतात असताना दर week end ला मुंबई पुणे ये जा करायचा तोच आता stl शिकागो ये जा करतो..
तर हे शिकागो साधारण २५० वर्ष जुनं.. शिकागो नदी च्या परीसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्या वासावरुन नदी ला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण)असं नाव दिलं.. पुढे त्या नदी काठी वसलेल्या शहराचं नाव देखिल तेचं पडलं... पुढे त्याचा अपभ्रंश होत आज प्रचलित असलेलं शिकागो असं नाव झालं.. भौगोलिक द्रुष्टिने अतिशय सोयिच्या ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या पूर्व पश्चिम व्यापार आणि द्ळणवळण शिकागो मार्गे मोठ्या प्रमाणावर चालत असे.. जवळच असलेल्या मिशिगन लेक मुळे पाण्याचा मुबलक साठा होता...त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कारखाने आणि उद्योग वाढले... ह्या सगळ्या कारखान्यामधून येणारं प्रदुषित पाणि पुन्हा लेक मधेच सोडल्याने लेक चं आणि शिकागो नदीच्या पाण्याचं बेसुमार प्रदुषण झालं... ह्यावर पुढे आनेक प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवले जात असे.. शिकागो नदी चे पाणी अजुनही direct पिण्यासाठी वापरत नाहीत.. एव्हडच काय तर ते पोहण्यायोग्य पण नाहिये...दरम्यान शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा जो downtown area आहे तो वसण्यास सुरवात झाली.. उंचच उंच इमारती आणि offices ह्यानी हा परिसर गजबजू लागला... मात्र १८७१ मधे लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला... "The great chicago fire" नावाने ओळखल्या जाणार्या ह्या आगीची व्याप्ती एव्हडी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबी आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला.. त्यावेळेला असलेल्या सोईंच्या अभावमुळे आगीची माहिती fire brigade ला सुमारे ४० मिनीटांनंतर समजली... नदीच्या पाण्यावर प्रदुषणामुळॆ तयार झालेल्या ग्रीस सारख्या जाड थरामुळे ही आग नदी मार्गे ही पसरली... त्यावेळेला कोणी कल्पनाही केली नसेल की एव्ह्ड्या भिषण आगी नंतर हे शहर पुन्हा उभं राहीलं.. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणण होतं की झालं ते चांगलच झालं शहर बांधताना आधी ज्या चूका झाल्या त्या सुधारायची संधी मिळाली..हवामानाच्या द्रुष्टीने शिकागो वाईटच.. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही एकदम भिषण... आपल्याला उन्हाळ्याची तशी सवय असते प्ण थंडीत नको होते..एकतर कधिही पडणारं बर्फ़ आणि बोचरं वारं.. एकदा बर्फ़ पडला की तो थंडी संपेपर्यंत वितळतच नाही..Ice skating, sking सारखे खेळ खेळायला मिळतात पण ते एखाद दिवस बरं वाटत.. लेक मिशीगन पण थंडीत गोठतो...
शिकागोच्या उपनगरांमधे राहाण्याच्या खूप जागा आहेत... अठरा पगड जातिंचे लोक शिकागोत रहातात.. आफ़्रिकन अमेरीकन पण खूप आहेत.. New York आणि washington ला पोलिस बंदोबस्त खूप कडक झाल्यापासून शिकागो आणि LA ही देखिल मह्त्त्वाची गुन्हेगारी केंद्र बनली आहेत...तशिही प्रत्येक बाबतित new york आणि शिकागॊ ची एकमेकांशी स्पर्धा चालू असते..आणि एकमेकांवर jokes करण सुद्धा.. आपल्याकडे जसं मुंबई पूणे चालू असत तसं.. :) (पण काहिही म्हंटलं तरी मुंबई ती मुंबईच तसच new york ते new york च त्याला कासलिही तोड नाही.. !!) New york ला गेल्यावर खूप homely वाटतं.. कारण मुंबई ची खूप आठवण येते.. शिकागो ला तसं होतं नाही त्यामूळे नविन काहितरी बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद मिळतो.. शिकागो down town म्हणजे एकदम happening जागा... इतर शहरांप्रमाणेच इथेही cruise tour मधून sky line चं दर्शन घेता येतं.. संध्याकाळी सूर्यास्त होता होता जर ही cruise tour घेतली तर खरोखरच डोळ्यांचं पारण फ़िटतं..
शिवाय शिकागो नदी मधून जाणारी architechtural tour पण खूप सूंदर आहे... पूर्वी लेक मिशिगन वर US Nevy चं प्रशिक्षण केंद्र (Nevy Pier) होतं... पण पुढे ते बंद करुन त्याचा tourist spot केला गेला... लेक मिशिगन आकाराने प्रचंड असून फ़क्त पाणी गोड असल्याने त्याला लेक म्हण्तात.. नाहितर समुद्र म्हणायचाच लायकीचा...Nevy Pier वर खूप दूकानं आणि खाण्याच्या जागा आहेत.. आणि फोटो काढ्ण्यासाठी खूप spots पण आहेत...चविने खाणार्यांना शिकागो downtown मधे खूप गोष्टी मिळतात...
एका हातात Ben and Jeery किंवा Hagen Dajz चं Ice cream आणि दुसर्या हातात camera सावरत संध्याकाळी cruise ride घेणं किंवा Nevy Pier वर भटकणं... म्हणजे आहाहा.. !! (ही माझ्या सूख म्हणजे नक्की काय असतं.. ह्या blog मधिल एक entry होऊ शकेल.. :)
Sears Tower आणि John honcock ह्या downtown मधल्या २ उंच इमारती.. पैकी sears tower ही सध्याची अमेरीकेतली सग्ळ्यात उंच इमारत आहे... John Hancock च्या ९६ व्या मजल्यावर एक restaurant आहे जे cocktails साठी प्रसिदध आहे.. पण आमच्या पैकी कोणीच पिणारं नसल्याने आम्ही तिथे जाउन फ़क्त फोटो काढून परत आलो होतो.. :)
शिकागो downtown चं रुप मला प्रत्येक ऋतू मधे वेगळं वाटलं.. summeer मधे ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं, fall मधे खेळून दमलेल्या पण तरीही अजून ही खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं असतं पण थंडीची चाहूल लागलेलं असते, भर winter मधे गेलात तर ते थंडीनी पिचून गेलेलं असतं त्यामूळे जरा थकल्यासारखं वाटतं chritsmas चा उत्साह जरी असला तरी तो typical US downtown मधला वाटत नाही, शिष्ठ ब्रिटन ची आठवण होते :), तर spring मधे परत एकदा उन्हाळ्याच्या तयारी ला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी सणासुदीच्या आधिचा काळ वाटतो... chistmas ला अतिशय सुंदर decorations असतात पण तेव्हा थंडी इतकी जास्त होती की फोटो काढताना हात थरथरून मी काढलेले सगळे फोटो हलले.. :(
शिकागो चं O'hare Internation airport म्हणजे US मधलं एक अतिश्य महत्त्वाचं आणि busy airpport.. पण हे "अतिसामान्य" ह्या दर्जात मोडणारं..शिकागो मधे काही बदल करायचा plan असेल तर त्यांनी तो airport सुधारला पाहिजे..
शिकागो मधे अजून एक "बघण्यासारखी" गोष्ट म्हणजे devon street..अगदी लक्ष्मी रोड ची आठवण होते. कसाही traffic, लेन न पाळणं, रस्त्यात कुठेही थांबून राहाणं.. एकदम मस्त वाटतं.. आणि तिथे सगळी Indian दुकानं आहेत खाण्यापासून दागिन्यांपर्यंत सगळं मिळतं.. पटेल लोकांची अगदी रेलचेल आहे.. :)
आपणा भारतियांना अभिमान वाटावा अशी शिकागो मधली एक गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदाचं ऐतिहासिक भाषण झालं ते सभाग्रूह..६ वेळा जाऊन अजूनही मी ते पाहिलेलं नाही.. :(
चला..निदान ते पहाण्याच्या निमित्ताने परत एकदा जायलाच लागणार.. :)
पूर्ण झालेला blog वाचून पाहिल्यावर तो जरा विस्कळित झालाय असं वाटतयं..जाऊ दे आत्ता तो repair करत बसायचा patience नाही.. पुढच्या वेळी जरा बरा लिहायचा प्रयत्न करेन.. !!

Once upon a time in India

26 July 4006,
The results of the on going research in the sea near west coast of India are out and it is concluded that there was a major city in this area around 2000 years ago. The city was capital of a region called Maharashtra. The city had high population density. It was financial capital of the country with lots of industrial areas around.
The records also showed that people from northern India were migrated to the city for jobs resulting in a excessive load on the infrastructure. Lack of maintenance and enhancements in the infrastructure, resulted into flood situations in each monsoon. Global warming enforced gradual increase in sea level leading to decrease in shore areas. Some areas were permanently evacuated because of water not draining out from the houses even after monsoon.
Around 1000 years ago, it was the worst monsoon in city resulting in a unimaginable flood and increase in sea water level because of which northern part of the Iceland completely drawn in the sea. Situation continued in the coming year resulting into whole city vanishing into the water. Researchers have found that there were many sky scrapers and some historic monuments in the city. There was a huge railway network around the city with around 5 Lakh people traveling by railway everyday. It was also found that there was excessive usage of plastic in the city resulting into blockage of the sewage water lines.
Some historical records show that this city was frequently attacked by the terrorists with government failing to control the situations. But the explosion of population was worse the explosions of the bombs as it had long term effects. Because of political interests, the north Indian vote banks were given more importance than maintenance of the city. Scientists have claimed that the city was destroyed because of lack of planning by governments rather than natural disasters.
Research is still going on to find more details about this financial capital. In local language, the city was called as Mumbai.

शेजारी

आज अचानक बर्याच दिवसांनी आमच्या शेजार्याचं दर्शन झालं. तो कधितरी बाहेर बसून चित्र काढत असतो तेव्हा hi hello होतं. पण बाकी काही नाही. एकूण तो जरा अत्रंगीच वाटतो. एकटाच असतो. कधिकधि मूली येतात रात्री (दरवेळी वेगळ्या).
आम्ही वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेजारी रहात असूनही आम्हाला एकमेकांची नावं पण माहीत नाहीत. हाच तर फ़रक आहे भारतात आणि अमेरीकेत.
मला अचानक डोंबिवली ला रहाणार्या आमच्या शेजार्यांची आठवण झाली. तिथे एका मजल्यावर आम्ही ३ कुटूंब अनेक वर्ष एकत्र राहीलो. बाकी २ घरात बरेच लोक बदलले. आमची building होण्याआधी सगळे त्याच गल्लीत वेगवेगळ्या वाड्यांमधे रहात होते. त्यामुळे परिचय आता जवळजवळ २५/३० वर्षांचा आहे. आमच्या अगदी दाराला लागून दार असलेल्या घरात दातार काका आणि माधूरी काकू रहात. ते पूर्ण जगाचे काका काकू. मला आठवतं तेव्हा पासून आमचे शेजारी तेच. माझ्या मोठ्या भावा पासून ते त्याच्या मुलापर्यंतची आसपासची मधली सगळी मुलं काकूच्या मांडीवर खेळली. आणि प्रत्येकाने काकूची साडी एकदातरी खराब केलीच आहे. काकू म्हणायची पण की मोठं झाल्यावर प्रत्येकाकडून एक साडी घेणार आहे. :) त्यांच्या घरात झोपाळा होता त्यामूळे सगळ्या मुलांना त्याचं पण आकर्षण असायचं. लहान मुलं काकू कडे रमत असतं. खाऊ च्या बाबतित लाड पण होतं कारण घरात लाडू, वड्या, चिवडा ह्यापैकी काहितरी नेहमीच केलेलं असे. लाडं होतं असले तरी फ़ाजिल लाड मात्र कधिही होत नसतं. उलट उत्तर देणं, हावरट पणा करणं, आचरटपणा आणि मस्ती करणं ह्यापैकी काही केलं की मात्र चांगला ओरडा मिळतं असे आणि त्या मुलाची घरी रवानगी केली जात असे. अश्या ओरडयाच्या वेळी मग कोणाची आई पण काही बोलत नसे आणि मधे पडत नसे.
कधिकधि काकू क्लास मधे शिकवायला जायची किंवा मग घरीच शिकवणी घ्यायची. बाकी चा वेळ घरीच असे. माझी आजी देखिल घरीच असल्याने त्या दोघिंचं चांगलं जमत असे. त्यांच्या पाकक्रूती च्या शिकवण्या चालतं. मघ कधिकधि कुठल्यातरी वड्यांचा प्रयोग बिघडला की हमखास दुपारी "बघा हो आजी जरा..ह्या वड्यांचा भसका होतोयं." असं म्हणून आमच्या आजीला बोलावणं येई. त्या दोघिंचं rework करुन झालं की अर्थातच वाटी आमच्याकडे ही येई. मी आणि माझा भाऊ दोघेही दिवसभर आजी जवळ असायचो त्यामुळे आजी काय करत्ये हे ओट्यापाशी उभं राहून बघताना स्वैपाकातले फ़ंडे आम्हीही ऐकत असू आणि मग काकू नी काही नविन पदार्थ केला आणि तो बिघडला की आम्हीही बिनधास्तपणे "तुझ्या चिरोट्यांमधे मोहन कमी झालयं " वगैरे काहितरी hi-fi dialouge मारत असू. :)(मग त्या चिरोट्यांमधे मोहन असो अथवा नसो. आणि मुळात मोहन म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही.)
कधि काकूचा भाऊ आला की आसपासच्या झाडांवरच्या कैर्या, जांभळं काढण्याचा कार्यक्रम होत असे आणि त्यालाही काकू चा सक्रीय पाठिंबा असे. क्रिकेट्ची match ही माझी आजी आणि काकू मिळून बघत.. म्हणजे दोघी आपपल्या घरी पण काही घडलं की दार उघडून एकमेकींना सांगणारं की हा आउट झाला, त्याची century झाली etc. सास बहू serials त्यावेळी नसल्याने दोघिंनाही cricket मधे interset होता.
माझ्या आजी ला आणि काकूला दुखणिही अगदी सारखिच होतं. दोघिंनाही थंडीचा त्रास होतं असे आणि दोघिंनाही आयुर्वेदिक औषधं घ्यायची भारी हौस त्यामुळे स्वैपाकाच्या प्रयोगांबरोबर दोघिंचेही वेगवेगळे वैद्य try करणंही चालू असे. आणि कसले कसले लेप, काढे, मात्रा वगैरेंवर चर्चा चालू असत. काका दोघिंनाही खूप चिडवायचे की आजी ७० वर्षांच्या आणि ही ४५ वर्षांची तरीही औषधं मात्र दोघिंची सारखिच. :)
काकूच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या की त्या आणि माझी आजी दुपारी पत्ते खेळतं असतं. कधि आजी गेली नाही की काकू तिला मुद्दामचं बोलावून घेत असे आणि म्हणे "तुम्ही रोज येत जा पत्ते खेळायला.. त्या तेव्हड्याच जरा busy रहतातं." ;)
आमचा मजला सोडला तर आमच्या तिनही कुटूंबांचं इतर कोणाकडे विषेश येणंजाणं होत नसे. तसच काकू स्वतःचा आवडी निवडीं बद्दल ही अगदी ठाम त्यामुळे कोणी काही बोललं की "आम्हाला असच आवडतं" असं म्हणून त्यांची बोळवण होत असे. आणि त्यामुळे दातार family शिष्ठ म्हणून famous. :) जेव्हा काकांनी नविन गाडी घेतली तेव्हा कौतूक बाजूलाच पण वर "दातारीण आधिच शिष्ठ त्यात गाडी घेतली आतातर काय बघायलाच नको. " :D अश्या comments पण ऐकायला मिळाल्या. आणि ह्या comments काकूनेच कुठूनतरी ऐकल्या आणि आम्हाला सांगितल्या.
काका काकू गप्पा मारायला एकदम jolly. आणि किस्से रंगवून सांगण्यात expert. आणि मुख्य म्हणजे कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं ह्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे माझ्या आजी पासून ते माझ्या ४ वर्षांच्या पुतण्या पर्यंत कोणाशीही समोरच्याला bore नं करता बोलू शकतातं. आम्ही पुण्याला रहायला गेल्यावर पण बरेचदा आम्हाला आठवण यायची की आत्ता शेजारी काकू असती तर पट्कन ५/१० मि. timepass करून आलो असतो. अधिक सहावासामुळे अर्थातच माझ्यापेक्षा माझ्या भावावर काका काकूंचा अधिक जिव आहे आणि मग बोलतानाही पट्कन "अमितचे बाबा ,अमितची आजी" असे उल्लेख येतं आणि मग लहानपणी मी पण लगेच "अमितचे बाबा नाही माझे बाबा" असं correction करत असे. :)
मधे आजीची तब्येत खराब झाल्याचं ऐकून काका काकू लगेच पुण्याला येऊन गेले. त्यांचाशी गप्पा झाल्यावर आजीलाही जरा बरं वाटलं. कधिकधि नात्यांपेक्षा सहवासाचे ऋणानुबंध अधिक घट्टं असतात हेच खरं. मी पण आता भारतात जाइन तेव्हा डोंबिवली ला काका काकूं च्या घरी जाइन आणि काकू ला तिची special साबुदाण्याची खिचडी करायला सांगेन आणि हो मुख्य म्हणजे त्यांचाशी भरपूर गप्पा मारेन. :)